लोकशिक्षक गाडगेबाबा यांचा संक्षिप्त जीवनकार्य परिचय

 लोकशिक्षक गाडगेबाबा यांचा संक्षिप्त जीवनकार्य परिचय


      एका हाती विज्ञाननिष्ठेची आणि दुसऱ्या हाती बुध्दीवादाची पताका घेऊन निघालेला ह्या मराठी मुलखातील एकमेव संत म्हणजे लोकशिक्षक गाडगे बाबा. आजच्या कितीतरी साक्षर सुधारकांना झपाटून टाकणारा तो निरक्षर झंझावात होता. अशा या समाजपरिवर्तनाने झपाटलेल्या बादळाचा जन्म २३ फेब्रुवरी १८७६ रोजी शेंडगाव, ता. अंजनगांव सुर्जी, जि. अमरावती या गावी झाला. पिता झिंगराजी माता सखूबाई यांच्या संसारवेलीवर आलेले हे परिवर्तनवादी विचारांचे सुंदर फुल, पूर्ण नांव डेबू झिंगराजी जाणोरकर पुढे पेहरावावरुन चिंधे, खराटे, गोधडे असे नावात बदल होवून गाडगेबाबा हे नाव कायम झाले.

       झिंगराजीचा देह दारूने संपविला. शेंडगांव सोडून डेवू आईसोबत दापु-याला मामाकडे स्थायिक झाला. डेबूचे वय शाळेत जावून शिकन्याचे, झाले भलतेच हातातील शिक्षणाची पाटी जावून शेणाची पाटी आली. डेबू गुराखी झाला. बीन भिंतीच्या शाळेत शिकू लागला. आई हे डेबूचे पहिले विद्यापीठ, सत्य, अहिंसा, प्रेम, स्वावलंबन, स्वाभिमान आणि सदाचाराचे धडे डेबूला येथेच मिळाले. श्रमप्रतिष्ठेचे धडेही त्याने येथेच गिरविले. शेतकरी डेबू पंधरा-सोळा वर्षाचा झाला. या काळात शेती करणाऱ्या कष्टाळू, बलदंड डेबूचे लग्न कमालपूर कोठा येथील धनाजी खलाकर (परीट) यांच्या मुलीशी झाले, संसार सुखात सुरु असतांना ग्रहण लागले. चंद्रभान मामाच्या गळयाभोवती सावकरी पाश लागले. मामाची जमीन कर्जात गेली. ती सोडविण्यासाठी डेबू राबू लागला. सावकाराचे कर्ज फेडू लागला. जमीन देण्यास सावकाराने नकार दिला आणि येथेच डेबूचा जीवन प्रवास परावृत्त झाला. कष्टाळू डेबू विद्रोही झाला. तो सावकाराच्या विरोधात लढला आणि विजय झाला. डेबूचा संसारगाडा सुरु असतांना कलावती, मुदूगल ही अपत्य गेली. डेबू खिन्न झाला. अशा खिन्न अवस्थेत एक दिवस कणसांवरची पाखरं हाकलित असताना एका दिव्य विभूतीने (सद्गुरूंनी) डेबूला दर्शन दिले. आणि 'बेटा तेरे लिए यह दुनिया खुली हो गई है. तुम जैसा चाहे बैसा जीवन का लेख लिखना बेटा, हा संदेश दिला । क्षणाभर आकाशात वीज चमकावी आणि सारा आसमंत दैदिप्यमान व्हावा तसे त्या विभुतीच्या शब्दाने डेबूच्या देहातील कण न् कण उजळून निघाला. डेबूच्या हृदयाचा गाभारा प्रकाशमान झाला. डेबूच्या मनात नवविचारांची पहाट झाली डेवू प्रसंगानुरुप जीवनाच्या क्षणभंगुरतेचा अर्थ लावू लागला. दरम्यान संतांची वचने, अभंग गुणगुणू लागला. पाण्यात पडलेला कलदार, विभुतीचा संदेश आणि गावांतील किर्तनकाराचे जीवनविषयक उद्बोधन हे तीन प्रसंग डेबूच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले आणि डेबूने एका रात्री घर सोडले. आसक्तीचे डोंगर मागे टाकून विरवतीच्या दिशेने तो झपाझप पाऊले टाकू लागला.

                      


       १ फेब्रुवरी १९०५ पासून १९१७ पर्यंत तब्बल एक तप डेबू महाराष्ट्रात भ्रमंती करीत होता. या बारा वर्षाच्या साधनेत डेबूने जनमनाचे, समाजाचे सुक्ष्म निरीक्षण केले. समाज अधोगतीची सगळी कारणे शोधली. या भीषण दुःखाचे मूळ त्याला माणसाच्या अज्ञानात दिसले आणि हा समाज बदलविण्यासाठी डेबूचा मग गाडगेबाबा झाले. असा हा प्रवास, गाडगेबाबांनी विषमतेने भरलेली समाज वहिवाट मोडून क्षमतेची नवी वाट कशी निर्माण करता येईल, अज्ञानी लोकांच्य अंगणात ज्ञानाची गंगा कशी आणता येईल, स्वावलंबन, स्वाभीमान कसा पेरता येईल, लोकगंग आणि श्रमगंगा यांच्या संगमावर सुखमय लोकजीवनाचे तिर्थक्षत्र कसे निर्माण करता येईल याद ध्यास घेतला होता. त्यासाठी प्रतिकात्मक जीवन जगून संवादात्मक कीर्तनशैलीचा आश्रय त्यांनी घेतला. गाडगेबाबांच्या अंगावरील अठरा ठिगळांचा अंगरखा म्हणजे समाजात विखुरलेल्या अठरापगड जाती एकसंघ करण्याचे प्रतीक होता. कानातील कवडी मानवी मूल्यांच्या अमूल्यनाच प्रतीक गाडगे जीवनाच्या क्षणभंगूरतेचे, तर डोक्यावरील खापर दोषाचे प्रतीक होते. गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे लोकशिक्षणाचे, लोकजागरणावे आणि लोकप्रबोधनाचे महत्वपूर्ण साधन होते. बाबांनी आ कीर्तनातून लोकांना जागे केले. त्यांना प्रश्न विचारुन जगण्याचे भान आणून दिले आणि भविष्या उज्वल दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला बाबांच्या कीर्तनात टाळ नाही, मृदुंग नाही तरीही हजारो लोक कीर्तनाला गर्दी करीत असत. दगडाचे टाळ करून लाकांचे प्रबोधन करणारा जगाच्या पाठीवरील एकमेव संत म्हणजे गाडगेबाबा.

        गाडगेबाबांची देवविषयक संकल्पना मोठी अद्भूत होती. बाबा एकेश्वरवादी होते. ते अंतिम सत्य एकच मानित होते. देव देवळात नाही तो माणसात आहे. माणसाची सेवा करा ‘ जनी जनार्दन संत बोलती वचन ' हा त्यांच्या करार होता. नरामध्ये नारायण पाहून त्याची सेवा, हीच खरी इश्वर सेवा हे त्यांच्या विंतनाचे फलित, बाबांनी खरा देव जगासमोर आणला.

        समाजातील अंधश्रद्धेवर गाडगेबाबांनी कडाडून प्रहार केला. माणसाच्या मनावर हजारों वर्षापासून बसलेले हे अंधश्रध्देचे भूत त्यांना उठवायचे होते. त्यासाठी बाबांनी सत्यनारायणाच्या कथेचा हिंमतीने उपहास केला. भोंदू बाबांची रेवडी उडवली. धर्माधता,ढोंग, धुपारे, गंडे, धागेदोरें, अंगात येणे, करणी कवटाळ, जंतर-मंतर ह्या सगळ्या गोष्टी झूठ मानल्या. देवापुढील मुक्या प्राण्यांच्या बळींना विरोध केला. बोकूळ कापल्याने दगडाचा देव प्रसन्न होतो ही खूळी अंधत्रध्दा घालवून लावली आणि बळी हा प्रकार बंद केला. दगडाचा देव आणि पाण्याचे तीर्थ केवळ पैसा कमविण्याचे साधन म्हणून ' तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी ' अशा खऱ्या देवाचे आश्रयस्थान दाखविले. बाबांनी समाजाला कर्मकांड, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता, देवधर्म सोवळे-ओवळे, समाधी, साक्षात्कार, लोभ, मोह या सगळयांमधून मुक्त होणाचा मुलमंत्र कीर्तनातून दिला.

      गाडगेबाबा निरक्षर होते, परंतु अक्षरयात्रचे आनंदयात्री होते. सागराप्रमाणे अफाट पसरलेल्या बहुजन समाजाचे आजच्या दुःखाचे मूळ अज्ञानात आहे हे त्यांनी नेमके हेरले होते. म्हणून शिक्षणावर अधिक भर दिला. समाजातील शेवटचा माणूस शिकला पाहिजे ही त्यांची तळमळ बाबांनी होती. ऐपत नसेल तर घरातील भांडी विका पण मुलांना शिकवा ही त्यांच्या हृदयाची आर्त हाक होती. श्रीमंतांनी गरीबांना शिक्षणासाठी मदत करावी ही अपेक्षा बाबांनी केली. शिक्षणातून ज्ञानी माणूस, शहाणा माणूस निर्माण करण्यावर बाबांचा भर होता. सेवा है शिक्षणाचे अंतिम ध्येय असले पाहीजे. शिक्षणाने माणूस हा माणूस होतो. जगात माणूस इथून-तिथून एकच आहे. माणसात भेद निर्माण करणाऱ्या जाती, धर्म, पंथ असे भेद ते मानित नसत. माणसाची खरी प्रतिष्ठा त्याच्या ज्ञानावर व त्याने केलेल्या जनहितैशी कामावर अवलंबून असते. जातीवर नसते म्हणून संमाजातील जातीभेद मोडून समाज शुध्द पायावर उभा राहावा यासाठी बाबा तळमळीने आपल्या कीर्तनातन सांगत असत. यासाठी प्रत्येकाने शिक्षणरुपी अमृताच्या पाणपोईवर गेले पाहिजे. माणुसकीयुक्त माणूस बनविने हा बाबांचा ध्यास होता. 'बुडती हे जन न देखवे डोळा या तळमळीतून समाजातील उपेक्षित अंध-अपंग गरीब माणसात ईश्वर शोधणाऱ्या बाबांनी यात्रेच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. ठिकठिकाणी अन्नसत्र सुरु केले. गरीब मुला-मुलींसाठी आश्रमशाळा काढून माणसाचे उन्नयन करण्याचा प्रयत्न केला.

       गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री म्हणजे मानवमुक्तीचा जाहिरनामाच होय.

भुकेलेल्यांना................................... अन्न

तहानलेल्यांना................................... पाणी

उधडयानागडयांना................................. वस्त्र

गरीब मुलामुलींना.................................... शिक्षण

बेघरांना........................................ आसरा

अंध ,पंगु , रोग्यांना............................ औषधोचार

पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना....................... अभय

गरीब तरुण तरुणींचे.................................लग्न

दुःखी व निराशांना.............................. हिंमत

         या दशसूत्रातील प्रत्येक सूत्र हे माणूसकीचा गहिवर होय. गाडगेबाबांच्या दशसूत्रातील सेवेपेक्षा जगातील कुठलाही देव मोठा नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, गाडगेबाबांमध्ये खिस्ताची करुणा, बुद्धाची अहिंसा आणि श्रीकृष्णाचा कर्मवाद यांचे विलक्षण मिश्रण होते.

         स्वच्छता हे गाडगेबाबांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होय. मग ते वैयक्तिक असो वा सार्वजनिक असो. जातीने परीट असल्यामुळे स्वच्छतेचे बाळकडू त्यांना जन्मसिद्ध लाभले होते. बाबांनी जनमनाच्या गाभाऱ्यात स्वच्छतेचा नंददीप तेवत ठेवला. ज्या गावात बाबा कीर्तनाला जात, ते गांव पहिले स्वच्छ करायचे व त्याच गावात रात्री किर्तन करायचे. त्यांच्या खराट्याने गावा- गावातील घाण जशी साफ केली तशी त्यांच्या वाणीने माणसाच्या मनातील घाण साफ करण्याचा प्रयत्न अहोरात्र केला. त्यांचा खराटा श्रमप्रतिष्ठेचे प्रतीक होता. हा खराटा श्रमाकडून स्वच्छतेकडे, स्वच्छतेकडून सौंदर्याकडे, सौंदर्याकडून सौजन्याकडे, सौजन्याकडून सेवेकडे आणि संपन्नतेकडे पेवून जाणारा होता. बाबांचे हे स्वच्छता मिशन पन्नास वर्ष अखंडपणे सुरु होते. खराटा, काठी, गाडगे, अंगरखा, कवडी ही सर्व साधने समाजपरीवर्तनासाठी प्रभावशाली ठरली. या सगळया आयुधाच्या माध्यमातून समाजाचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न गाडगेबाबांनी केला. गाडगेबाबा कृतीयुक्त संत होते. आधी केले मग सांगीतले हा त्यांचा बाणा होता. याचा वापर करुणनच त्यांनी समाजातचेतना निर्माण केली. बाबांनी साहित्यनिर्मिती केली नाही, परंतु खुद्द गाडगे बाबा आज साहित्याचा, अभ्यासाचा विषय झाले आहेत. विद्यापीठीय साक्षरांनी एका निरक्षर माणसाला तत्वचिंतक म्हणून मान्यता दयावी यापेक्षा अधिक ते काय ?

        अशाप्रकारे नवा समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी स्वत: कृती करणारे, दगडातील नव्हे तर माणसातील देव शोधणारे, स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे अंध, अपंग, गोर, गरीब यांची सेवा करणारे आणि इतरांना करायला लावणारे, मुक प्राण्यांच्या बळीला विरोध करणारे, शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे म्हणून संबोधणारे, खरा ईश्वर कोण हे पटवून देणारे, यासाठी माणूस जोडून नव्या चैतन्यमय राष्ट्राची बांधणी करणारे, म्हणूनच तुमच्या-आमच्या सर्वांच्या मनाचे अनभिषिवत सम्राट झालेले गाडगेबाबा २० डिसेंबर, १९५६ रोजी ब्रम्हलीन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते गाडगेबाबांचा अग्निसंस्कार झाला.

         सांप्रत काळातील भीषण समाजवास्तव बदलविण्यासाठी बाबांनी दिलेल्या विचारांचा आणि कृतीचा ठेवा प्रत्येक माणसाने जोपासला पाहिजे केवळ जोपासलाच पाहिजे नव्हे तर कृतीत उतरविला पाहिजे. स्वार्थ त्यागून लोकसेवा करणे आणि इतरांना आपल्यासारखे बनविणे ही बाबांची अपूर्ण इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांच्या विचारांची आणि कृतीची धग थंड होवू देता कामा नये. तो विचारांचा वारसा तुम्ही-आम्ही सर्वांनी पुढे न्यावा ही अपेक्षा.

Post a Comment

0 Comments