अभिसंधानासंबंधी अध्ययन (Learning by Conditioning):
मनुष्य हा बऱ्याचशा पद्धती अभिसंधानाने शिकत असतो. एका उद्दिपकासी स्वाभाविकपणे निगडीत असलेली प्रतिक्रिया त्या उद्दिपकाच्या जोडीने येणाऱ्या दुसऱ्या उद्दिपकासी जोडली जाते. त्याला अभिसंधान असे म्हणतात. अध्ययन प्रक्रियेचा महत्त्वाचा, समजला जाणारा हा प्राथमिक स्वरुपाचा प्रकार म्हणजे अभिसंधान होय. दोन वेगवेगळ्या घटनामध्ये किंवा प्रसंगामध्ये साहचर्य संबंध शोधणे हा त्या मागचा उद्देश आहे. उदा. घंटीचा आवाज झाला रे झाला की तास संपविला जातो, एखाद्या चौकामध्ये आपण गाडी घेऊन जात असतांना लाल दिवा दिसल्यास थांबण्याची प्रक्रिया घडून येते. विज चमकल्यानंतर आपल्याला ढगाचा गडगडाट ऐकायला मिळतो. असा क्रम आपल्याला सर्वसाधारणतः दिसून येतो. याचा कुठेतरी साहचर्य संबंध हा जोडला जातो. ह्या साहचर्य संबंधामध्ये अनेक गोष्टी शिकल्या जातात. रशियन मानसशास्त्रज्ञ इन्हाँन पॅवहेलावह यांचा अभिसंधानासंबंधी कुत्र्यावरील प्रयोग फार प्रसिद्ध आहे. कुत्र्यावर ऑपरेशन करुन लाळ निर्मितीची प्रक्रिया घंटीच्या आवाजाशी कशी संलग्नित झाली, हे त्यांनी दाखवून दिले. कुत्र्याच्या तोंडात अन्न असतांनाच लाळ निर्मिती होते, असे नव्हे तर अन्न नसतांना सुद्धा लाळनिर्मिती होते, हे संशोधनांती सिद्ध करन दाखविले आहे.
इव्हाण पॅव्हेलाव्हने कुत्र्याला टेबलावर उभे करुन पट्यांनी बांधून टाकले. कुत्र्याच्या तोंडातून लाळ सवू लागल्यानंतर ती काचपात्रेच्या खाली जमा होईल अशी नलिकेद्वारे व्यवस्था केली. तसेच लाळेचे प्रमाण मोजता येईल, त्याचे कमी जास्त प्रमाणात बदल होण्याची व्यवस्था असुन त्याची नोंद घेण्यात आली.
प्रयोग सुरु झाल्यावर प्रथम घंटीचा आवाज देण्यात आला. कुन्याने कान टवकारुन इकडे तिकडे पाहिले, परंतु लाळेचा एक थेंबही गळाला नाही. व काही वेळाने त्याचे समोर अन्नाची बशी ठेवण्यात आली. अन्न पाहताच लाळ स्तब लागली व काचपात्रेत लाळेचे थेंब जमा झालेत. पुन्हा दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळेस घंटीचा आवाज देण्यात आला व १० सेंकदानंतर अन्नाची बशी देण्यात आली व लगेच लाळनिर्मितीस सुरुवात झाली. हाच क्रम बराच वेळेपर्यंत चालु ठेवला. शेवटी घंटीचा आवाज दिल्यानंतर अन्न न देताही लाळ सवू लागली व प्रतिक्रिया दिसून आली.
म्हणजेच घंटीचा आवाज व अन्नपदार्थ हे दोन उद्दीपक बरेचदा एकत्र दिल्यानंतर लाळोत्पादनाची प्रक्रिया होऊ शकते. ज्या प्रतिक्रिया अन्न ह्या उद्दिपकास यांनी अध्ययनामध्ये अनुकरणाच्या महत्त्वाचा सखोल अभ्यास केला. मनुष्य हा रुढी, परंपरा, भाषा, शिष्टाचार, श्रद्धा, विश्वास, अभिरुची, आवडी-निवडी ह्या अनुकरणातून शिकत असतो.
मुल हे शिक्षकाचे, आईवडीलाचे, भावंडाचे व आपल्या नातलगाचे अनुकरण करीत असते. मुल हे भाषा शिकते ते अनुकरणाद्वारेच. अनुकरणामधून मुल सुक्ष्मरितीने लक्ष देणे, धारणानिर्मिती, स्मरणशक्ती वाढणे, विस्मरण कमी करणे, प्रेरणा, हावभाव, भावभावना व्यक्त करणे इत्यादी क्रिया शिकते.
अनुकरणासंबंधीच्या एका प्रयोगात एकाच वयाच्या दोन मुली सारख्याच परंतु दोनपैकी एकीला जिण्याच्या पायऱ्या कशा चढाव्या यासंबंधी सांगण्यात आले. दुसरीला मात्र नुसते पहात बसविण्यात आले. पहिली ज्याप्रमाणे जीण्याच्या पायऱ्या चढली. त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा तशाचप्रकारे जीण्याच्या पायऱ्या चढली. यावरुन असे म्हणता येईल की ती गोष्ट ती अनुकरणाने शिकली.
संदर्भ : अभिनव सामान्य मानसशास्त्र
0 Comments