प्रश्न : कामगारांच्या चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कामगार चळवळीचा ऐतिहासिक आढावा स्पष्ट करा.
उत्तर :- कामगारांच्या चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी
सध्या जगभर १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात सर्वप्रथम कामगाराचे महत्त्व व हित जाणले ते युगपुरुष महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते पुढे आले. त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कारण नारायण लोखंडे यांनी मुंबईमध्ये सर्वप्रथम कामगारांचे संमेलन भरवून कामगारांची चळवळ उभारली होती आणि सुमारे ६,००० कामगारांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सरकारला दिले होते. त्या निवेदनामध्ये कामगारांच्या असंख्य समस्या व कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निराकरणासंबंधी मागणी होती. कामगारांच्या प्रश्नांना सर्वप्रथम वाचा फोडली ती नारायण लोखंडे यांनी. त्यांनतर १८९० मध्ये लोखंडे यांनी मुंबईमध्ये १०,००० कामगारांचे भव्य संमेलन भरविले होते आणि सरकारला कामगारांसाठी रविवारची सुटी देण्यासंबंधी निर्णय घ्यायला भाग पाडले होते. या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने कामगार महिलाही उपस्थित होत्या. त्या चळवळीमध्ये दोन कामगार महिलांनी कामगार महिलांच्या समस्यांचे विवरणात्मक इतिवृत्त सदर केले होते. १०० वर्षांपूर्वी सार्बजनिक सभेमध्ये महिलांनी भाषण करण्याचे ते प्रथमच उदाहरण होते. त्यानंतर १८९० मध्ये सरकारने भारतीय औद्योगिक कामगारांची वास्तविक स्थिती जाणण्यासाठी व सरकारला सहाय्यता करण्यासाठी नारायण लोखंडे यांची निवड केली होती. त्यावेळी श्री. लोखंडे हे मुंबई मिल कामगार संघाचे अध्यक्ष हाते. मुंबई मिल कामगार संघाच्या अध्यक्ष या नात्याने स्थापन समितीसमोर कामगरांचे मागणी पत्र त्यांनी प्रस्तुत केले होते. त्या मागणी पत्रामध्ये कामगारांच्या विविध समस्यांच्या निराकरणाची मागणी होती. त्यानंतर १८९१ मध्ये महिला कंपनी कायदा बनला. ज्याच्या अंतर्गत कामगारांचे काम करण्याचे तास व सुरक्षेसंबंधी उपाय होते. या कायद्यांतर्गत कामगारांना ज्या सुविधा मिळाल्या त्याचे संपूर्ण श्रेय नारायण लोखंडे यांना जाते. त्यामुळेच भारतीय कामगार संघटनेच्या चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. श्री. लोखंडे यांनी जी कामगारांच्या हितासाठी चळवळ उभारली होती ती देशातील कामगारांची पहिली चळवळ होती. त्यामुळे या कामगारांच्या प्रथम चळवळीचा उल्लेख करणे येथे गरजेचे आहे.
कामगार चळवळीचा ऐतिहासिक आढावा :
भारतीय कामगार चळवळीचा ऐतिहासिक आढावा घेताना असे म्हणावे लागते, की भारतातील संथगतीने औद्योगिकरण, कामगारांचे अज्ञान, कामगारांची स्थलांतराची वृत्ती व त्यांची विवशता लक्षात घेतल्यास भारतात कामगार संघटनांचा उदय उशिरा झाला. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार संघटनांच्या उदयासाठी जे प्रयत्न झाले ते अपुरे होते. आधुनिक कारखानदारीच्या किंवा कारखाना पद्धतीचा विचार करता सुरवातीस मुंबई व बंगालमध्ये अनुक्रमे कापड व बूट यांचे कारखाने वाढू लागले. या कारखान्याच्या वाढीबरोबरच मुले व खिया यांच्या नोकरीविषयी समस्या वाढू लागल्या. समस्यांची सुरवात झाली इ.स. १८७५ मध्ये साहेबदाजी बंगाली यांच्या नेतृत्वाखाली काही समाजसुधारकांनी विशेषतः मुले व स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी कायदे करण्याची मागणी केली. याचा परिणाम म्हणजे १८८१ मध्ये कारखाना कायदा पास झाला. परंतु कामगारंची संघटना प्रस्थापित करण्याविषयी विचार पुढे आला नाही. भारतातील कामगार संघटनांची स्थापना महाराष्ट्रातील नारायण लोखंडे यांनी केली. त्यांनी इ.स. १८८४ मध्ये कारखाना आयोगापुढे समस्या मांडल्या. पण त्याचा विचार सरकारने केला नाही. त्यावेळी १०,००० कामगारांनी श्री. लोखडे यांच्या नेतृत्वचाखाली आंदोलन सुरू केल होते व त्याचे फलित म्हणजे कामगारांना साप्ताहिक सुटी मान्य केली गेली. त्यानंतर श्री, लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन झाली. १९१८ ते १९२४ या काळात चांगल्या कामगार संघटना अस्तित्वात आल्या. त्यात १९१८ मध्ये मद्रास कामगार संघटना, १९२० मध्ये ऑल इंडियन ट्रेड युनियन कांग्रेस, १९२० ला सी.पी.पी. एम्प्लॉईज युनियन, १९२६ सालचा कामगार संघटनांचा कायदा म्हणजे कामगार संघटनांचा विजय, असे म्हणता येईल. या कायद्यामुळे कामगर संघटनांना स्थैर्य व दर्जा प्राप्त झाला. पुढे १९२८, १९४२ व १९४८ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात येऊन काही बदल करण्यात आले. या कामगारांच्या चळवळीत नारायण लोखंडे यांच्याखेरीज लाला लजपतराय, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, कॉ. श्रीपाद डांगे, ना. म. जोशी इत्यादी थोर व्यक्तींनी कामगार चळवळ सशक्त केली आणि या चळवळीत त्यांहजारो कार्यकर्त्यांनी साथ दिली. ही परंपरा जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली १९७४ ला रेल्वे कामगारांचा ऐतिहासिक संप झाला. तसेच डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली ६२ गिरण्यांमधील अडीच लाख कामगारांनी १८ जानेवारी १९८२ ला सुरू केलेला संप इतिहासातील सर्वात मोठा संप ठरतो. आज संघटित क्षेत्रातील कामगारही आपल्या न्यायिक हकांसाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात घरकाम करणाऱ्या मोलकरणींची चळवळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कुठलीही कामगार चळवळ ही एकूण लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचे स्वरूप आर्थिक भागीदारीएवढे मर्यादित केले, तर तो यशस्वी होऊ शकत नाही. त्याकरिता ज्याप्रमाणे स्वातंत्र्यापूर्वी कामगार चळवळीला एक व्यापकवर्गीय स्वरूप होते तसेच आज असायला पाहिजे.
0 Comments