जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे

              

https://yuvrajrathod992000.blogspot.com/2021/03/blog-post_79.html?m=1

 जागतिकीकरणाचे फायदे (Advantage of Globalization) :- 

             जागतिकीकरणाचे अनेक फायदे प्रत्ययास येतात. त्यामुळेच प्रस्तुत जागतिकीकरण प्रक्रियेला मान्यता मिळालेली आहे. १९९१ पासून भारतात ही प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. म्हणजे १५ वर्षाचा कालखंड लोटला आहे. या काळात दिसून आलेले फायदे पुढीलप्रमाणे . 

(१) गतिमान औद्योगिकीकरण : - 

         विकसित राष्ट्रांकडून अविकसित राष्ट्राकडे औद्योगिक प्रकल्प येणारी गती जागतिकीकरणात वाढलेली आहे. मारुती उद्योग, हिरो होंडा, टेलिव्हिजन क्षेत्र, रेफ्रिजरेटरपासून वीजनिर्मिती माहिती तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीमुळे भारतात औद्योगिकीकरण गतीमा झाले आहे.

(२) भांडवलाचा प्रवाह :- 

        जागतिकीकरणामुळे विदेशी भांडवलाची गुंतवणूक भारतात वाढली आहे. विदेशी गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या सवलती कामगारांचे सहकार्य, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि राजकीय इच्छाशक्ती याद भांडवलाचा ओघ वाढला आहे. त्यात अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया व अना देशांचा सहभाग महत्त्वाचा आहे. खाजगीकरण व उदारीकरणामुळे भांडवलाची गुंतवणूक वाढावी यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.

(३) उत्पादनाची वाढलेली गती  :- 

           १९९१ नंतर भारतात विदेश भांडवलाच्या गुंतवणुकीतून उत्पादनाची गती वाढलेली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादन वाढवून बाजारपेठ काबीज केली आहे. जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या स्पर्धेतून निर्यात वाढली आहे. विदेशी चलनाची गंगाजळी सुद्धा वाढलेली आहे.

(४) उच्चप्रतीचे जीवनमान : -

            भारतात जागतिकीकरणामुळे नवीन उदयोग आरंभ झाले. बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादनाच्या क्षेत्रात सहभागी झाल्या. ह्या उद्योगात काम करण्यासाठी अकुशल आणि विशेषतः कुशल नोकरांची भरती करण्यात आली रोजगाराच्या संधी वाढल्या. इंजिनीअर व व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधारक यांना चांगते वेतन मिळू लागले. त्याचे जीवनमान पूर्वीच्या तुलनेत वाढले. इतकेच नाही तर आखातों देशात आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशात त्यांना रोजगार प्राप्त झाला.

(५) तंत्रज्ञानात प्रगती :- 

         जागतिकीकरणाच्या प्रगतीतून भारतातील युवकान विदेशात शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. प्रगत देशांनी प्राप्त केलेले तंत्रज्ञान भारतात आले. संगणकाच्या क्षेत्रात आरंभी विदेशाच्या मदतीने परंतु पुढे स्वबळावर तंत्रज्ञानात प्रगती झाली. बंगलोर, हैदराबाद शहरातील उपलब्ध सोयी, त्याचे उदाहरण आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगती लक्षणीय आहे.

(६) उपभोगात वाढ :- 

 जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शासनाने स्वीकारलेल्या उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या धोरणातून विदेशी तंत्रज्ञान भारतात आले. चांगल्या प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. स्पर्धेमुळे गुणवत्ता वाढली. काही कंपन्यांचा एकाधिकार संपुष्टात आला आणि नवीन वस्तूंचे उत्पादन वाढले. लोकांच्या उपभोगात वाढ झाली. ज्या कुटुंबात सायकल होती त्या कुटुंबाचे उत्पन्न वाढण्याबरोबर स्कूट आणि नंतर मोटारीची खरेदी होऊ लागली. संगणक स्वस्त झाले, सहज उपलब्ध होगाच्या कर्जामुळे सुद्धा जनसामान्यांच्या उपभोगात वाढ झाली.

(७) अभिवृत्तीत बदल :- 

           या प्रक्रियेचा आणखी सकारात्मक परिणाम म्हणजे लोकांनी संकुचित वृत्तीचा त्याग करुन एक व्यापक अभिवृत्ती मान्य केली आहे. माटिती तंत्रज्ञान, , तांत्रिक देवाणघेवाण, वाढणारे संपर्काचे क्षेत्र लोकांच्या अभिवृत्तीतील परिवर्तनासाठी जबाबदार आहे.

(८) लोकशाहीस पोषक वातावरण :- 

           आतापर्यंत आर्थिक व्यवहारासमवेद हितीचे केंद्रीकरण स्वेदशापुरतेच मर्यादित होते.त्यातून प्रगत देशातील तंत्रज्ञानाचा लाभ तितका मिळू शकला नाही. साम्यवादी राजवटी कोलमडू लागल्या. लोकांचे उत्पन्न  पटले. सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले. दारिद्र्य, बेकारीसारख्या समस्या वाढल्या. हे तक्षात घेऊन जगातील सर्व राष्ट्रांनी खुलेपणाचे धोरण स्वीकारले. प्रगत देशातून भांडवल, व तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला. ही सर्व प्रक्रिया लोकशाहीसाठी पोषक ठरली आहे. साम्यवादी देशांनी सुद्धा लोकशाही स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. थोडक्यात, जागतिकीकरणाने लोकशाहीला पाठबळ मिळाले आहे. 

(९) दारिद्र्याची तीव्रता कमी :-

         सर्व साधारणपणे जागतिकीकरणाने दारिद्र्यात बाढ झाली आहे, असा आक्षेप घेण्यात येते. परंतु या आरोपात कोणतेही तथ्य नाही. भारतात १९७८ साली दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या ५५% होती. १९९८ मध्ये ती लोकसंख्या २६% झाली आहे. याचा अर्थ असा की, जागतिकीकरणाने लोकांना रोजगार मिळाला, त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच दारिद्र्याची तीव्रता घटली आहे.

(१०) व्यक्तिमत्त्व विकास :- 

            भारतातील इंजिनीअर व व्यवस्थापन तज्ज्ञ यांना विदेशात फार मोठ्या संधी प्राप्त झाल्या आहेत. अमेरिकेत संगणक क्षेत्रात हजारो भारतीय उच्चपदे भूषवित आहेत. पाश्चात्य विदयापीठातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. आखाती देशात सुद्धा भारतीय मोठ्या प्रमाणात अर्थाजन करीत आहेत. हॉटेल, उद्योग, धंदे वैदयकीय तांत्रिक अशा क्षेत्रात भारतीयांनी आपला ठसा उमटविला आहे. या सर्वांना व्यक्तिमत्त्व विकासाला पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात मिळालेली संधी हे जागतिकीकरणाचे फलित मानले जाते.

अशाप्रकारे जागतिकीकरणाची विविध प्रकार्ये प्रत्ययात येतात. 

जागतिकीकरणाची तोटे (Disadvantage of Globalisation) :- 

         जागतिकीकरणासंबंधी दोन मतप्रवाह प्रचलित आहे. त्यापैकी एक विचारसरणीनुसार जागतिकीकरण ही अपरिहार्य प्रक्रिया असून या प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. दुसऱ्या मतप्रवाहानुसार जागतिकीकरणाचे अनेक तोटे आहेत. पहिल्या विचारांचे समर्थक भांडवलदार, उद्योगपती, काही राजकीय नेते आणि काही अर्थतज्ज्ञ आहेत. खसन्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या मध्ये डावेपक्ष, काही अर्थतज्ज्ञ आणि स्वेच्छासंघटनांचा (NGO) समावेश आहे. येथे काही अपकार्याचा निर्देश करू.

(१) देशीय उदयोग व व्यापारावर आघात :- 

         आधुनिक तंत्रज्ञान, महामानावर होणारे उत्पादन तसेच उत्पादित मूल्य कमी झाल्यामुळे देशीय उद्योगाची पिछेहाट होत आहे. गृहोदयोगावर झालेल्या आघातामुळे ते बंद होत आहे. तसेच व्यापार बहुराष्ट्रीय कपन्यांच्या हातात जात असल्याकारणाने व्यापारावरसुद्धा विपरित परिणाम झाला आहे. अनेक लहान उद्योग बंद पडले असून मोठा मासा लहान माशांना गिळतो. तसे चिन्ह दिसून येत आहे. उदा. पार्लेसॉफ्ट ड्रिंक्स, कोकाकोलाने घेतलेला. मॉडर्न फुड्स हा सरकारी प्रकल्प, हिंदुस्थान लिव्हरने घेतला.

(२) श्रमिकांची समस्या :- 

         जागतिकीकरणामुळे बऱ्याच उद्योगांत नवीन यंत्रसामग्रीतून नवीनीकरण झाले. अशा उद्योगातून श्रमिकांना काढून टाकण्यात आले. कार्यालयात संगणकीकरण केल्यामुळे मनुष्यशक्तीची गरज कमी झाली. काही लोकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कापड गिरण्या किंवा पॉलिस्टर कापड उदयोगाचे आधुनिकीकरण झाल्याकारणाने श्रमिकांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली. या प्रक्रियेतून श्रमिकांच्या चरोजगारीचा प्रश्न जटिल झाला. भारतात प्रचंड ताकदीचे उद्योग आल्यामुळे आजारी उत्योगांचे प्रमाण वाढले. मार्च १९९९ मध्ये २७९३ मोठे उदयोग आणि '३०६२२१ लघुउदयोग आजारी पडले त्यातून बेरोजगारी वाढली.

(३) श्रीमंत आणि गरिबीतील तफावत :- 

        जागतिकीकरण प्रक्रियेत दारीकरण आणि खाजगीकरण समाविष्ट आहे. यातून भांडवलशाही अर्थव्यवस्था होत होत आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आधार नफा मिळविणे असतो. त्यामध्ये व्योगधंद्याचे मालक श्रीमंत होतात. त्या प्रमाणात श्रमिकांना वेतन मिळत नाही. नोकरुन गरिबी वाढत जाते. श्रीमंत आणि गरिबीतील तफावत कमी न होता, ती वाढती असते. याचा प्रत्यय भारतीय समाजातही येत आहे.

(४) निसर्गाचे शोषण : - 

          बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्याप्रमाणात निसर्गाचे दोहन करतात. 'कोकाकोला' सारखी कंपनी पाण्याचे इतके दोहन करीत आहे की त्या लसरातील पाण्याची पातळी खूप खाली गेली. आहे, महत्तम उत्पादन वितरण आणि महत्तम नफा मिळविण्यासाठी निसर्गाचा विचार करण्यात येत नाही.

(५) प्रदूषण :-

 मोठमोठ्या कारखान्यातून उत्पादित वस्तूवर प्रक्रिया केल्यानंतर जलप्रवाहात सोडलेल्या पाण्यामुळे जलप्रदूषंणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.

(६) चंगळवाद :- 

जागतिकीकरणातून विदेशी मालाची आयात वाढली आहे.विदेशी कंपन्यांनी केलेल्या उत्पादनांसाठी ग्राहक मिळविण्यासाठी प्रचंड प्रमाणावर जाहिराती करण्यात येत आहेत. मध्यम व निम्नवर्गातील सदस्य अशा जाहिरातींना बळी पडून अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. बाजारात नवनव्या आणि आकर्षक वस्तूंची भरमार आहे. त्या वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना मांडल्या जातात. लोक वस्तू खरेदी करण्यातून आपली प्रतिष्ठा व्यक्त करतात. एक प्रकारे समाजात चंगळवाद वाढत आहे. 

      पूर्वी वासाहतिक गुलामगिरी होती. आता आर्थिक गुलामगिरी येऊ लागली आहे. सामाजिक न्याय आणि कल्याण कार्यक्रमाकडे दुर्लक्ष होत आहे. उदा. शिक्षण स्वीकार अपंग, वृद्धसेवा, बालकल्याण वगैरे.

संदर्भ : अ. जागतिकीकरण ब. जनसंज्ञापन माध्यम 

Post a Comment

0 Comments