भ्रष्टाचारविरोधी चळवळ

 भ्रष्टाचारविरोधी चळवळ

       प्रस्तावना :

                    


          स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत भारतातील व महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनामध्ये कधी नव्हे तो इतका भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा विषय आवडीने, हौशीने, स्वार्थाने चर्चिला गेला. अर्थात यात धुरंधर समाजसुधारक होतेच. याचबरोबर हौशे, गवशे आणि नवशांनी कधी नव्हे वर्तमानपत्रांच्या, मीडिया, चॅनलच्या ठळक बाबतीत आपल्यावर कॅमेराचा प्रकाश पाडून घेतला. खरेतर या चळवळीत समाविष्ट होणाऱ्या सामान्य नागरिकांना पुरेपूर कल्पनाही नसते, की भ्रष्टाचार म्हणजे पैसा खाणे होय इतपत समजण्याची त्यांची कुवत असते. अशाच चळवळीत वर्तमानकाळात जुन्यानेच पण अधिक सक्षम व भक्कम पाठीव्याने भारताच्या नव्हे, तर जगाच्या पटलावर आलेल्या महाराष्ट्रातील हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी, नागरी समाज व जनलोकपालच्या चळवळीचा जाणीवपूर्वक विचार करावा लागेल.

       भ्रष्टाचार अर्थ :

          भ्रष्टाचार म्हणजे वाममार्गाने पैसे खाणे होय.

       भ्रष्टाचार हा शब्द जरी उच्चारला, तरी संवेदनशील मानवी मनाला घृणा आल्यावाचून राहत नाही. इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले. स्वातंत्र्यानंतर देशाने अनेक क्षेत्रांत विविध धोरणांच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीचा वेग जेवढा असला पाहिजे तेवढा नाही. येथील सर्व व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय सुराज्याची पहाट निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही.

       राळेगणसिद्धी (ता. पारनेर, जि. अहमदनगर) या गावाचे शिल्पकार মष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते किसन बाबूराव हजारे यांनी महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याच जणू विडाच उचलेला आहे. पण हे एका व्यक्तीचे काम नाही. त्यासाठी सर्वसामान्य जनतेपासून लक्ष्मीपती, उद्योगपती व हा देश चालविणारे सर्व राजकीय पक्षांचे नेते या सर्वांची साथ मिळणे अपेक्षित आहे. गेल्या १-२ वर्षांपासून महाराष्ट्रातील भ्अष्टाचारविरोधी चळवळीने देशव्यापी स्वरूप प्राप्त केले आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या चळवळीने देशव्यापी स्वरूप धारण करणे, ही तर महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.

         आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचाराची पालेमुळे खोलवर रुजलेली दिसून येतात. ही पालेमुळे जर टाकून देऊन भ्रष्टाचारमुक्त करावयाचा असेल, तर एकजुटीने त्यांच्याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. हजारेंनी ही लढाई निकराने चालू ठेवली आहे. लोकांचा या लढाईला उत्स्फूर्त सहभागदेखील मिळत आहे. परंतु हा सहभाग फक्त गर्दी वाढविणारा असून त्यामध्ये भ्रष्टाचार करणार नाही व करू देणार नाही, असा कृतिशील सहभाग घेणाऱ्यांची संख्या किती आहे हा मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत कोणत्याही चळवळीत कृतिशील व कृतीप्रवण लोकांचा सहभाग वाढत नाही तोपर्यंत त्या चळवळीची परिणामकारकता वाढत नाही.

         अरविंद केजरीवाल, किरण बेदी, योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह हजारेंच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचारविरोधी चळवळ अधिक व्यापक केली आहे. त्यापूर्वी श्री. हजारेंची भ्रष्टाचारविरोधी चळवळ. महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. त्यांनी अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला आहे. ज्यामध्ये सुरेश जैन, बबनराव घोलप यांचा प्रमुख समावेश होतो. या दोन्ही मंत्र्यांना पक्षाने त्यावेळी निवडणुकीची तिकिटेही दिली नव्हती व न्यायालयात त्यांच्याविरोधात खटलेही चालू आहेत.

        महाराष्ट्रात पर्यायाने देशात माहितीचा अधिकार अस्तित्वात आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने माहितीचा अधिकार निर्माण करण्यात आला आहे. या अधिकारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे उदयास येण्यास चालना मिळाली आहे. अनेक संस्था, नेतेमंडळी, अधिकारी वर्ग यांच्याकडून होणारा भ्रष्टाचार यामुळे अनेक अधिकारी, प्रशासकीय सेवक, मंत्री यांना घरी जावे लागले आहे. हे श्रेय श्री. हजारे व त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीला जाते.

          सर्वसामान्य माणसाला सुसह्य जीवन जगता यावे, यासाठी भ्रष्टाचारविरोधी चळवळ व माहितीचा अधिकार खऱ्या अर्थाने एक आशेचा किरण ठरत आहे. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी हे प्रभावशाली माध्यम आहे. सत्य, अहिंसा व सत्याग्रह या त्रिसूत्र्रीच्या माध्यमातून हे आंदोलन चालते. कुणालाही सहज सहभाग घेता यावा, असे हे आंदोलन आहे. त्यामुळेच त्याची व्याप्ती सहज वाढते आणि सहजपणे लोकसहभाग वाढतो. हे या आंदोलनाचे खरे वैशिष्ट्य आहे.

संदर्भ : महाराष्ट्रातील चळवळी (सामाजिक आणि राजकीय )

Post a Comment

0 Comments