भावना ( Emotions )

                    


भावना (Emotion) :- 

      भावना व्यक्तीला श्रेष्ठ व उन्मत अशा पातळीवर नेऊनी पोहोचवितात. भावना ही मनुष्यामध्ये प्रबळ असल्यामुळेच व्यक्तीला जीवनात सौंदर्य व सुख समाधान लाभलेले आहे. तिव्र भावनेमुळेच मनुष्य अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मनुष्य करु शकतो. भावना जर मनुष्याची कधी कधी तिब्र झाली तर मनुष्य भावनेच्या भरात काही अविचाराचे व अयोग्य वर्तन सुद्धा करु शकतो. थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की, भावना ही एक शक्ती आहे व तिच्यावर योग्य असे नियंत्रण ठेवले तर मनुष्य जीवन सुखकारक होऊ शकते.

       माणसाच्या जिवनात भावनेला अतिशय महत्त्व आहे. भावना नसती तर मनुष्याचे जीवन रुक्ष, निरस, निरागस व यत्रवत झाले असते. दररोजच्या जीवनातील मनुष्याला सुख व आनंद याची जाणीव ही झालीच नसती. कोणाबदल दुःख, प्रेम ही त्याला दिसेनासे झाले असते. देशभक्ती, राष्ट्राभिमान, निष्ठा, परंपरा, रूढी, मुल्ये इत्यादींना तसुभरही स्थान उरले नसते. म्हणजेच भावनेच्या अभावी व्यक्ती व यंत्रमानव यांच्यात काहीही भेद उरला नसताच.

        वर्तनाला चेतना देण्याचे कार्य जसे प्रेरणेमपुन घडते तसेच ते भावनाकडून सुद्धा घडत असतेच. म्हणून संकटप्रसंगी उद्भवणारी जी परिस्थिती असेल त्या स्थितीला तोंड देता येण्यासाठी जी व्यक्तीला मनाची तयारी करावी लागते, त्यामध्ये भावनाचा कार्यभाग अतिशय महत्त्वाचा असतो.

                 


भावना म्हणजे काय ?

    भावना यामध्ये आपण अनेक शब्दाचा उपयोग करीत असतो. दुःख, भय, आक्रमकपणा, क्रोध, राग, सुख, तिरस्कार अशा अनेक शब्दांनी वेगवेगळ्या भावना दाखविल्या जातात. भावनेला इंग्रजीमध्ये शब्द 'Emotion' हा आहे व हा शब्द Emovere ह्या लॅटीन शब्दापासुन तयार झाला आहे. त्याचा अर्थ 'प्रक्षुब्ध होणे, भडकणे, अस्वस्थ होणे होय. भावना माणसाला अस्वस्थ करतात. रागाबलेली व्यक्ती आहे. तर तिचा चेहरा लालबुंद होवो, छाती ही धडपड उडतच राहाते, अंगावर थरथर होते, आपण 'दात ओठ खाऊ लागतो', बाहूला स्फुरण येते व आपल्या शरीरामध्ये अनेक बदले घडून येतात. अर्थातच भावनेमुळे शरीराचा समतोल विषडतो न माणसानी सद्सदविवेकबुद्धी कुंठीत होते. 

             


भावनेच्या व्याख्या :- 

१) ' भावना म्हणजे व्यक्तीला अनुभवास येणारी व वर्तनातून प्रकट होगारी अनैच्छिक स्वरूपाची प्रक्षुब्धावस्था किंवा उत्तेजित अवस्था होय.' 

२) 'आंतरेंद्रिय क्रिया, बोधात्मक अनुभव व वर्तनासह संपुर्ण व्यक्तिच्या मानसिक कारणांनी उद्भवलेल्या तिब्र प्रधुन्धतेला भावना म्हणतात.'

३) " आंतरिक शारीरिक बदल व मनोभाव, व या अवस्था ज्यातुन व्यक्त होतात अशा वार्तनिक प्रतिक्रिया या सर्वांनी मिळून जो अनुभव एखाद्या परिस्थितीच्या किंवा घटनेच्या बोधनातून निष्पन्न होतो त्याला भावना म्हणतात."

४) पिलिगीना १९८१, " जागृत अवस्थेमधील व्यक्तिनिष्ठ भावनानुभव, राग भिती, आनंद, खिन्नता, आश्चर्य, किळस यासारख्या सुखात्मक व दुःखात्मक भावविष्कारांना भावना असे म्हणतात."

५) " सुखद किंवा दुःखद अनुभूती निर्माण करणान्या मनाच्या बोधात्मक अनुभूतीस भावना असे म्हणतात."

भावनेची वैशिष्ट्ये :- 

      भावना निर्माण होणे ही एक कठीण स्वरुपाची समस्या आहे किंवा प्रक्रिया आहे त्यामध्ये अनेक वैशिष्ट्याचा अंतर्भाव होतो. ती वैशिष्ट्ये कोणती आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. की वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) भावनेमुळे संपुर्ण शरीर स्थापित होते. म्हणून भावना म्हणजे जैविक मज्जास्नायुची प्रक्षुब्ध अवस्था आहे. शारीरिक प्रेरणांनी तयार होणाऱ्या प्रक्षुब्धेसारखीच ही अवस्था आहे.

२) तिव्र भावनेमुळे जास्तीत जास्त प्रमाणात क्रियाशीलशक्ती प्राप्त होत असते. याप्रमाणे भावना वर्तनाला तिन चालनाशक्ती पुरविणारे घटक आहेत. कधीकधी ह्या अतितीव्रचेतनशक्तीमुळे माणसाच्या हातुन काही गृहीत कृत्ये घडू शकते. ह्या कामाचे रुपच समायोजनात्मक असेल तर त्या परिस्थितीमध्ये घडून येणारे समायोजन चांगले राहील. याउलट ही चेतनाशक्ती विधातक स्वरूपाचे काम व्यक्तीकडून घडून आणू शकते.

३) एखाद्या ठिकाणी भावना व्यक्त करित असतांना आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवामध्ये वेदन, संवेदन, प्रत्यक्ष, स्मृती, कल्पणा व विचार ह्या बोधनात्मक घटकाचा कार्यभाग फारच महत्त्वाचा असतो. ज्या वातावरणामध्ये आपण राहातो व वावरत असतांना आपल्याला काय अनुभव येते व त्या स्थितीमध्ये आपली भावनात्मक प्रतिक्रिया कशी राहील, यावर विसंबून आहे. उदा. लमसमारंभाला आपण गेल्यानंतर आपल्यासोबत आलेते लहान मुल जर कार्यक्रमामध्ये काही कृती करीत असेल, इकडेतिकडे उगीचच फिरणे, लहाणमुलासी खेळ खेळणे, हातातील वस्तु एकमेकाला फेकून मारणे इत्यादी. आपण मुलांच्या वागण्याबद्दल राग व्यक्त करीत नाही. परंतु घरामध्ये जर मुलाची भांडणे होत असतील तर त्याच्यावर आपण रागावतो.

४) भावनेचे अभिव्यक्तीकरण आपण एखाद्या कृतीत करत असतो. कारण कोणतीतरी चूक आपल्या हातून घडत असते व तिचा परिपाक आपण भावनेतून व्यक्त करतो. उदा. रडणे, हसणे, बडबडणे, अर्बाच्य बोतणे, जोरात ओरडणे, ओक्साबोक्सी रडणे, मुसफुसणे, भिती घालणे इत्यादी कृतीच्याद्वारे आपण आपल्या भावना व्यक्त करीत असतो. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, जोरात बोलणे, स्वरयंत्र दाबून बोलणे, आसनस्थिती बदलणे, संतापणे इत्यादीद्वारे देखील भावना व्यक्त होतात.

५) भावना जर ओसंडून आल्या की, अंतर्गत जैविक बदल सुद्धा घडून येतात. ढृदयात धडपड वाढणे, गतीमध्ये बदल, श्वास क्रियेची गती वाढते, मज्जारजु व मज्जापेशी भरभर वाहाणे, अंगाला थरकाप सुटणे, घाम येणे, लाळग्रंथीच्या क्रियेत बदल होणे, अंधेरी येणे हे जैविक बदल भावना उद्दिपीत झाल्यास घडून येतात.

६) निकोप व निरोगी शरीर राहण्यासाठी व योग्य मानसिक आरोग्यासाठी भावनिक संतुलन असणे महत्त्वाचे आहे. वातावरणाला अनुसरून आपल्याला भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करता आल्या पाहिजेत. आक्रस्ताळेपणा, चिडखोरपणा, हातातील वस्तू फेकून देणे, वर्तनामध्ये विसंगती, विस्कळीतता, चुकीचे प्रत्यक्ष, संताप, क्रोध, राग इत्यादीमुळे भावनिक संतुलन बिघडते. भावनिक असंतुलन असेल तर मानसिक आरोग्य धोक्यात येते.

भाव आणि भावना मधील फरक (Differences Between Feel ings & Emotions) :-

        भाव व भावना ह्या दोहोचा अगदी जवळचा संबंध आहे. भाव म्हणजे प्रत्यक्षामुळे निर्माण झालेली मनाची साध्या व सोप्या स्वरुपाची सुखद व दुःखद अवस्था होय. तर भावना ही मनाची, व्यक्तिमत्त्वाची व शरीराची प्रक्षुब्ध अशी अवस्था आहे. एखादे लता मंगेशकर यांचे सुरेल व मधुर गाणे ऐकले की आपल्याला सुखद जाणीव होते. आनंदभाव निर्माण होतात. याऊलट एखाद्या निरभ्र ठिकाणी आपण उभे राहिलो की, दुःखद जाणीव होते. भावनेमध्ये शरीर थरथरणे, थरकाप सुटणे, घाम फुटणे, चेहरा लालभोर होणे, बोबडी होणे, कंप सुटणे, श्वासोच्छवास जलद चालणे, अंधारी येणे, शरीर पूर्ण हालणे इत्यादी शारीरिक बदल घडून येतात. म्हणजे भावना ही शरीरासाठी सरळ व साधी अवस्था नसुन प्रक्षोभ उडविणारी अवस्था आहे.

       भाव व भावना मध्ये फरक असा आहे की, भाव हे जैविक प्रत्यक्षाचे एक विशिष्ट स्वरूप आहे. परंतु भावनाचे स्वरुप अधिक जटील व संकिर्ण व किचकट स्वरुपाचे आहे. आपण शेतामध्ये गेल्यानंतर पायामध्ये काटा रुतला तर त्यापासून निर्माण होणारे दुःख हे भाव होय. परंतु प्रिय व्यक्तीचा अपघात झाल्यास होणारे दुःख है भावना होय. थोडक्यात आपणाला असे म्हणता येईल की, भावापेक्षा भावना अधिक गुंतागुंतीच्या व उच्चपातळीवर निर्माण झालेला असतात. भायामध्ये जैविक प्रक्षुब्धता निर्माण होत नाही. भावनेमध्ये मात्र संपुर्ण शरीर उद्दिपीत होत असते. ग्रंथीच्या अति स्रावामुळे शरीरामध्ये खळबळ होणे हे भावनेचे मुख्य लक्षण आहे. भावामध्ये अशी खळबळ आढळून येत नसतेच. भावना जैविक समतोलच नष्ट करतात. भावामध्ये जैविक समतोलास मुळीच धक्का पोहोतच नाही. तिब्र भावनेमध्ये माणसाचा सद्सदविवेक भ्रष्ट होतो. पुष्कळदा त्याच्या हातून अयोग्य कार्य हे घडू शकते. भावामध्ये असे काहीही घडून येत नाही.

संदर्भ :- अभिनव सामान्य मानसशास्त्र


Post a Comment

0 Comments