भारतातील गटकार्य ( Group Work in India )

 भारतातील गटकार्य ( Group Work in India )

                 


          भारतामध्ये गटकार्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासली असता प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परंतू नंतरच्या काळात विवाह, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचे स्वरुप स्पष्ट होते. अर्थार्जनामुळे स्वरुप सुद्धा भारतामध्ये सामुहिक दिसून येते. भारतीय आदिवासी समाजामध्ये वनसंपदा संकलन व अर्थाजन प्राचीन काळापासून सामुहिकरित्या होते आहे. यानंतर धार्मिक विधी सुद्धा गटागटाने करतांना आढळून येतांना दिसतो. पूर्वीच्या काळी मठामध्ये लोक एकत्रीत वास्तव्य करीत असे व मदतीची भावना तेथून प्रेरीत होतांना आढळून येते. धर्मशाळा, मठ हि गटकार्याच्या केन्द्रस्थानी होते.

नंतरच्या काळात मात्र यास व्यावसायिक स्वरुप प्राप्त होवून शैक्षणिक कार्याची सुरुवात १९३६ मध्ये Tata Institute of Social Science, Mumbai ने केली. भारतातील सामाजिक चळवळीचा अभ्यास केला असता सामुहिक रित्या आंदोलनास प्रारंभ होवून संघटन योग्यरित्या केल्या जात होते. प्रारंभिक सुधार आंदोलनाच्या माध्यमातून समुह कार्यास गती मिळालेली दिसून येते. यानंतरच्या काळात औद्योगिकरणामध्ये वाढ झाल्यामुळे कामगारांची संख्या वाढली तर गट निर्माण होवून कामगारांचा लढा उभा राहू लागला. प्रस्थापित भांडवलदारांच्या शोषणाच्या विरोधातील लढा यामुळे यशस्वी झाला.

       म. फुले, म. गांधी, रविंद्रनाथ टागोर, राजा राम मोहन रॉय, विवेकानंद यांनी सामाजिक चळवळीला प्रोत्साहित करुन लोककल्याणार्थ कामे केली. महिलांवर होणारे अत्याचार, हिन्दू धर्मातील अनिष्ट प्रथा जाती प्रथा इ. विरोधातील आंदोलनाची धुरा सांभाळली व समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणले. रविंद्रनाथ टागोर यांनी श्रीनिकेतन प्रकल्प उभारून ग्रामीण जनतेचा विकास करण्याकरीता तेथील लोकांना संघटित केले. श्रीनिकेतन प्रकल्पाच्या माध्यमातून गटकार्य योग्य प्रकारे होवू लागले. ग्रामीण जनतेचा विकास साधून ग्रामीण जीवनाला नवीन आयाम दिले व आर्थिक, सामाजिक बदल घडवून आणला.

     लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्याचा लढा उभारण्याकरीता लोकांमध्ये संघटन निर्माण व्हावे या उद्देशाने सार्वजनीक गणेशोत्सवाची स्थापना केली. सार्वजनीक गणेश मंडळ स्थापन करून संघटन निर्माण केले. त्याचा फायदा स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजतागायत जनतेस होत आहे. या संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याकरीता लोक एकत्र येवू लागले. आजही हीच परंपरा जोपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. या मंडळाच्या माध्यमातून आरोग्य विषयक कार्य शैक्षणिक कार्य, उत्कृष्टरित्या राबविल्या जाते. भारतामध्ये समाजकार्याच्या इतिहासा सोबत गटकार्य जोडल्या गेले आहे. अनेक नामवंत तज्ञांनी गटकार्याचा इतिहास भारतीय सामाजिक चळवळीला जोडला आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये अनेक समस्या होत्या, त्याचे निर्मूलन करतांना समाज सुधारकांनी सामुहिकरित्या भाग घेतला. बौद्धाच्या काळात सुद्धा ही सुधारणा झाली आणि बौद्ध विचार सरणीचा प्रसार झाला. तर तो मठांच्या माध्यमातून एकत्र येवूनच. प्राचीन काळामध्ये काही सुधारणावादी विचारधारणा अस्तित्वात आल्या. त्या सुद्धा सामुहिकरित्या पाळल्या गेल्या. तत्कालिन समाज व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन झाले त्याचे सर्व श्रेय सामुहिकरित्या राबविलेल्या प्राचीन चळवळींना जाते. समाजव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेली असमानता खोलवर रुजली होती. त्यामुळे वर्णव्यवस्थेने जोर धरला होता श्रेष्ठ व कनिष्ठ भेद अस्तित्वात येवून कनिष्ठ अर्थात मागासलेल्यांमध्ये न्युनगंड निर्माण झाला. या वर्गास कोणतेही अधिकार नव्हते, त्यामुळे समाज जीवन. बिघडले होते. पशु समान जीवन जगावे लागत असे. अशा समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याकरीता अनेक सुधारणावादांनी प्रयत्न केले. 

संदर्भ : समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धती 

Post a Comment

0 Comments