स्मृती किंवा स्मरण (Memory)
स्मरणशक्ती ही मनुष्याला मिळालेली एक प्रकारची देणगी आहे, असे समजले जाते. एखाद्या मित्राचा पत्ता आपण आपल्या वर्गामध्ये लिहन ठेवलेला असतो, परंतु कोणत्या वहीमध्ये लिहिलेला आहे, हे आपल्याला आठवतच नाही. परंतु त्या मित्राचे आपण घर पाहिलेले असते. ते स्मरणाने आपल्याला सूचित होते. यावरुन आपण जो प्रसंग आठवतो. त्याच्याशीच. स्मृतीचा संबंध आहे, हे स्पष्ट होईल.
स्मरणामुळेच आपण भूतकाळातील प्रसंगासी संबंध शोधून सध्याच्या स्थितीसी त्याचा अर्थ लावित असतो. स्मरण, विचारशक्ती, भावना द्या उच्च प्रकारच्या मानसिक प्रक्रिया आहेत, त्यामुळे पुढे काय होईल, याचे विधान सुद्धा आपल्याला करता येते. उच्च मानसिक प्रक्रियामुळेच कोणत्याही माणसाची गुणवत्ता ही वाढीस लागते.
स्मरण ही व्यक्तीला शब्दाच्या बाबतीतच होते, असे नाही तर वासाची स्मृती, गंधाची स्मृती, चवीची स्मृती व प्रकाशाची स्मृती असे अनेक प्रकार स्मृतीचे आहेत. स्मृतीच्या बाबतीत व्यक्तीपरत्वे भेद असतात. काही व्यक्तीला नाव आठवणे' याची स्मृती चांगली असते तर कुणाला प्रसंगाची स्मृती चांगली असते.
स्मृतीची व्याख्या :
१) " पूर्वी अनुभवलेल्या गोष्टीची पफी धारणा होणे व चिन्हाच्या रुपात त्याची पून्हा जाणीव होणे म्हणजे स्मरण होय."
२) वूडवर्थच्या मते, " मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय."
३) " प्रथम शिकण्यात आलेल्या किंवा अनुभवलेल्या गोष्टीचे धारण, प्रत्यावाहन, प्रत्याभिमान करण्याची क्षमता म्हणजे स्मरण होय."
४) " एखाद्या अनुभवाचे संस्कार मनुष्यावर घडणे, त्या संस्काराच्या प्रतिकात्मक चिन्हाचे धारण केले जाणे व प्रत्यावाहन, प्रत्याभिमानाच्या रुपाने त्या प्रतिक चिन्हाचे बोधावस्थेत येणे, या सर्व गोष्टी मिळून स्मरण म्हणतात.
५) " सरावामुळे किंवा प्रयत्नामुळे बर्तनात घडणारे व टिकून राहणारे बर्तनातील मापण योग्य बदल म्हणजे स्मरण होय."
स्मृती ही चार घटक मिळून बनल्याचे निदर्शनास येते. ते घटक पाहणे आवश्यक आहे, ते पुढीलप्रमाणे आहेत.
१)अध्ययन -Learning
२) धारणा - Retention
३) प्रत्यावहन - Recall
४)प्रत्याभिमान -Recognition
१. अध्ययन (Learning) :
स्मृतीची ती प्रथम पायरी आहे. " सरावामुळे किंवा प्रवल्लामुळे व्यक्तीच्या वर्तनात होणारे स्थायी किंवा कायम स्वरुपाचे बदल म्हणजे अध्ययन होय." स्मरण हे अगदी व्यवस्थित झाले पाहिजे असे वाटत असेल तर सर्वप्रथम अध्ययन हे चांगले होणे अत्यंत गरजेचे आहे. अध्ययन फार परिणामकारक व्हावयास पाहिजे, असे असेल तर अध्ययनाचे घटक म्हणजे अध्ययन विषयाची तांबी, अध्ययनाची अर्थपूर्णता, मौखिक प्रत्यावाहन, अधिक अध्ययन, प्रपाठ ह्याकडे अवधान देऊन अध्ययन केले तर अध्ययनामुळे मेंदूवर होणारे संस्कार पके व रेखीव होतात, स्पष्ट होतात.
२. धारणा (Retcntion) :
आपण ज्या पाठाचे वाचन करतो त्याचे होणारे संस्काराचे जतन करणे म्हणजे धारणा होय. धारणा ही मेंदूमध्ये साठवून ठेवणारी क्रिया आहे, तिचे स्वरुप व्यक्तीला आलेल्या अनुभवावरूनच कळून येऊ शकते. एखादी घटना जर व्यक्तीला बरोबर सांगता येत नसेल तर तीला ती योग्यप्रकारे आठवत नाही, असे आपण म्हणू. किंवा त्या घटनेसंबंधीची व्यक्तीची धारणा लुप्त झाली, असे म्हणता येईल. याऊलट ती घटना जर तिला सांगता येत असेल तर धारणा तिव्र आहे, असे म्हणू.
३. प्रत्यावहन (Recall) :
अगोदर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या गोष्टीची किंवा घटनेची आठवण होणे याला प्रत्यावाहन असे म्हणतात. उदा. वर्गखालीमध्ये अनेक विद्यार्थी असतात. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक मी काल शिकविलेली कविता मला म्हणून दाखव. त्या विद्यार्थ्याला ती कविता पाठ असल्यामुळे तो म्हणून दाखवतो. परंतु ही कविता त्याला वार्षिक परिक्षेमध्ये लिहावयास आली तर ती त्याला आठवूनच लिहावी लागेल. अध्ययन केल्यानंतर मेंदूमध्ये त्या कवितेचे संस्कार कितपत दृढ झाले असेल, त्यावर अवलंबून राहील.
प्रत्यावाहणाच्या मापणासाठी एबिंगहाँस Ebinghaus या मानसशास्त्रज्ञांनी अर्थहिन शब्दाचा उपयोग केला. हे शब्द प्रयुक्तासाठी सर्वचप्रकारे नविन असतात. त्यामुळे प्रयुक्त व्यक्तीचे पाठांतर होतच नाही. जसे, QZB, LTZ, WXP, XPD हे ते अर्धहीन शब्द समुह आहेत. प्रयुक्त व्यक्तीस अशाप्रकारचे दहा शब्द काही ठराविक काळासाठी पाठ करावयास दिले जातात. व त्यातील किती शब्द प्रयुक्त व्यक्तीला आठवतात, त्याचे निरिक्षण केले जाते. या यादीतील किती शब्द पाठ झाले आपण म्हणून दाखवा. येथे प्रयुक्त जितके शब्द बिनचूक म्हणून दाखवतो. ते त्याचे प्रत्यावाहन होय. एखाद्या चेतकामध्ये एकत्रितपणा, संकिर्णता, स्वयंभूतता, अध्ययन करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती, तिची कार्यक्षमता, प्रयोगामध्ये सहकार्य देण्याची तयारी, त्याची भावनावस्था, पाठांतरामध्ये दाखविलेली वारंवारता, व्यक्तीगत घटक, मानसिक घटक, मानसिक संनिवेश, कामामध्ये तत्परता इत्यादी घटकापर प्रत्यावाहन अवलंबून असते.
प्रत्याभिज्ञान (Recognition) :
एखादी गोष्ट, पटना, प्रसंग, व्यक्ती, बस्तु याआधी पाहिली असल्याचे आपण जेव्हा सांगतो तेव्हा त्याला प्रत्याभिज्ञान म्हणतात. पूर्णतः आपल्याला ओळख असणे, यापुर्वी कुठेतरी पाहिले असल्याची जाणीव होणे व संपूर्णरित्या परिचय आहेच अशी खात्री असणे त्याला प्रत्याभिज्ञान म्हणतात. उदा. आपल्याला जी व्यक्ती पूर्वी कधीतरी भेटलेली आहेच, तिचा पूर्णतः परिचय आहेच. आपण त्या व्यक्तीला सांगतो! बरोबर आहे, गेल्या सहावर्षाआधी मी आपणास बस स्टँडवर भेटलो होतो. आपला संपूर्ण चेहरा ओळखीचा वाटतो. आपण, सुखदेवरावच आहेत ना! होय होय! या बोलण्यामधून आपल्याला प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? हे लक्षात येईलच.
प्रत्याभिज्ञान ही प्रक्रिया फारच साधी, सोपी व सरळ अशी आहे. प्रत्याभिज्ञानामध्ये वस्तुचे स्मरण हे चांगले होते व वस्तु समोर उपस्थित असते. हे मुख्य वैशिष्ट्ये आहे. प्रत्याभिज्ञान प्रक्रियेमध्ये अनुभवलेली वस्तु, घटवा व प्रसंग आपल्या समोर उपस्थित असतो व आपले संबंध हे दृढ होण्यास मदत होते. उदा.खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय शोधा. यामधील प्रयुक्त व्यक्तीला नेमके उत्तर ओळखायचे असते. प्रयुक्त व्यक्तीला सुरुवातीला १० चित्रे दाखविण्यात येतात व ते चित्र दाखविल्यानंतर काही थोड्यावेळाने दुसरे १० चित्रे दाखविती जातात. सुरुवातीला अभ्यासलेले १० चित्रे व नंतर दुसरे अभ्यासलेले १० चित्रे असे एकूण २० चित्रे दाखविली जातात. पूर्वी पाहिलेले १० चित्रे व त्यानंतरचे पाहिलेले व अभ्यासलेले १० चित्रे कोणकोणते, हे ओळखायचे असते. सुरुवातीच्या अभ्यासलेल्या चित्रापैकी त्याला किती चित्रे ओळखता येतात. यावरुन प्रयुक्त व्यक्तीचा प्रत्याभिज्ञान गुणांक काढता येतो.
संदर्भ :- अभिनव सामान्य मानसशास्त्र
0 Comments