विस्मरण (Forgetting) :-
स्मृती जशी मानसिक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे विस्मरण हे सुद्ध मानसिक प्रक्रिया आहे. कोणतीही व्यक्ती असो तिला विस्मरण हे कोण गोष्टीचे होते. त्यामुळे काही ठराविक व्यक्ती द्या आपल्या आठवणीत व ठराविक वस्तु विसरतात. उदा. स्वतःचा चष्मा, चाबी, गाडीची चाबी, रुमा गोष्टी विसरण्यासाठीच असतात.
पाठ्यवस्तुचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर तीचे स्मरणामध्ये रुपांतर भविष्यात आपल्याला ती माहिती आठवावी असा आपला विचार असतो आपल्याला ती आठवत नाही, आपण विसरतो. आपल्याला स्मृतीबंधातुन माहिती पाहिजे त्यावेळी आपल्याला बाहेर आणता यावी. परंतु वेळेवर आप आठवत नाही. उदा.एखाद्या सभेमध्ये आपल्याला प्रमुख पाहूण्यांचा परिचय घ्यायचा असतो, परंतु ऐनवेळेवर आपल्याला नावच आठवत नाही. नावाचे आपल्याला विस्मरण होते. आपण इकडे तिकडे बावचळण्यासारथे पा लागल्यास आपली फजिती होते.
विस्मरणाची व्याख्या :
१) " एखादी गोष्ट योग्य वेळी न आठवणे, कधीच न आठवणे, त्यातील भाग न आठवणे म्हणजे विस्मरण होय."
२) " विस्मरण म्हणे प्रत्यावाहन व प्रत्याभिमानाची कार्यक्षमता होय.".
३) " विस्मरण म्हणजे नकारात्मक धारणाच होय."
४) " स्मृती बंधातुन एखादी गोष्ट योग्य त्यावेळी बाहेर काढता न येणे विस्मरण होय."
स्मरणाचे प्रकार (Types of Memory) :-
स्मृतीचे दोन प्रकार आहे. १) अल्पकालीन स्मृती (Short term mermory) २) दिर्घकालीन स्मृती (Long term memory)
१) अल्पकालीन स्मृती (Short term memory) :-
आपल्याला जे ज्ञान होते त्याचे संस्कार आपल्यावर होत असतात. ज्या पाठाचे आपण अध्ययन केल्यानंतर पून्हापून्हा त्याचे वाचन जर केले नाही तर तो विसरला जातो. वाचनामुळे जे संस्कार आपल्यावर होतात ते फक्त ३० सेंकदापर्यंत टिकतात. नंतर ते विसरले जाते, नष्ट होते. ह्या अल्पकालावधीमध्ये जी स्मृती असते तिला अल्पकालीन स्मृती असे म्हणतात. उदा. एखादी व्यक्ती आपल्याला बाजारात भेटली व ती लगेचच निघून गेली व आपण लगेच म्हणतो. ती व्यक्ती कोण होती, आपल्याला त्याचे नाव आठवतच नाही. अशाप्रकारे ही स्मृती कमी वेळ थांबणारी असते. म्हणून तिला अल्पकालीन स्मृती म्हणतात. ह्या स्मृतीमध्ये धारणा फारच कमी बेळपर्यंत टिकते. सर्वसाधारणतः १५ ते १६ वर्षे वयाच्या मुलाची धारणा सात किंवा आठ इतकीच असू शकते. पारणेमध्ये वाढ ही कघीच होत नसते.
२) दीर्घकालीन स्मृती (Long term memory) :-
ज्यावेळी आपल्या अध्ययनामुळे झालेले ज्ञान अनेक वर्षे, अनेक दिवस, अनेक महिनेपर्यंत टिकून राहतात. काही काळ गेल्यानंतर ते पुन्हा प्रस्थापित होऊन जसेच्या तसे आठवतात त्याला दिर्घकालीन स्मृती असे म्हणतात.
दिर्घकालीन स्मृतीमध्ये पूढील गोष्टी स्पष्टपणे आपल्याला आठवतात. त्याचे दिर्घकालीन स्मरण राहाते. उदा. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, आपल्या शाळेमध्ये शिक्षक व महाविद्यालयामधील शिक्षक वृंद, आपल्या जीवनातील आपण घेतलेली पदवी व पदव्यूत्तर प्रमाणपत्र, आपले अगदी जवळचे नातलग, मित्र इत्यादी गोष्टीचे आपल्याला स्मरणच इतके झाले असते की, झोपेतही आपण ह्या गोष्टी सांगू शकतो.
दीर्घकालीन स्मृतीमध्ये संकेतन , साठवणूक, प्रत्यानयन प्रामुख्याने आधळून येतात.
अ ) संकेतन ( Encoding ) :
आपल्या जीवनामध्ये आपण जी कार्ये करतो ती करीत असतांना आपल्याला फार अनुभव येतात व त्याची नोंद आपल्या मेंदूपटलावर होत असते. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती आहे. ती विशेष प्रयत्नाने करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी करतांना आपल्याला आनंद होतो. ती वस्तु, गोष्ट, घटना दिर्घकाल स्मरणामध्ये राहतो.
ब) साठवणूक ( Storage ) :
आपण अनेक पुस्तकाचे वाचन केले, अनेक माहिती मिळविली. त्याचे संस्कार आपल्या दिर्घकालीन स्मृतीमध्ये टिकून राहातो. परंतु ज्या माहितीचे आपण पुन्हा अध्ययन जर केले नाही तर ती मात्र विसरली जाते. त्याचे संस्कार क्षीण होतात, नष्ट होतात. त्याचे आपल्याला स्मरण होणारच नाही. त्याचप्रकारे आपल्या अध्ययनामध्ये, प्रत्यावहनामध्ये व्यत्यय जर सतत येत असतील म्हणजे आपण ज्ञान प्राप्त करीत असतांना मुलाचे किंचाळणे, बाहेरुन येणाऱ्याने वाजविलेली घंटी, कर्कश आवाज किंवा इतर काही अडथळे इत्यादीमुळे प्रत्यावाहनात व्यत्यय येतो व त्यामुळे विस्मरण होऊ शकतेच.
क) प्रत्यानयन ( Retrieval ) :
अल्पकालीन स्मृतीमध्ये जतन केलेली माहिती ही आठवणे आवश्यकच आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला प्रश्न केल्यास आपण उत्तरे देताच उदा. ९८७७६६५५१२ हा मोबाईल नंबर आपण पाहातो व तो मोबाईलवरती लाऊन संबंधित व्यक्तीसी बोलल्या जाते. तेव्हा तो नंबर ९-८-७-७-६-६-५-५-१-२ ह्या क्रमाने सर्वच्या सर्व अंक आपल्या स्मरणामध्ये राहतात. आपल्या समोर असा विचार येतो की, अल्पकालीन स्मृतीमध्ये हे अंक कशाप्रकारे आठवतात? ह्याचा आपल्याला शोध घ्यावाच लागतो व ते जाणीवेच्या केंद्रस्थानी आणावे लागतात.
१) क्षति सिद्धांत (Decay Theory) :
विस्मरण कशामुळे होते ? का होते व केव्हा होते ? याचे उत्तर शोधण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक आहेत. त्याचा विचार करणे आवश्यक आहे.
i) अनुपयोग :
आपण ज्या गोष्टींचे अध्ययन करतो. त्या अध्ययनाचा जिवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये फायदा करून घेतला नाही तर काही काळानंतर ते अध्ययन आठवेनासे होईल. म्हणजे त्याचे विस्मरण होईल. म्हणून महाविद्यालयामध्ये शिकणारा एखादा विद्यार्थी काही काळानंतर शिक्षकाला भेटल्यानंतर सर ! मला ओळखलत का? शिक्षक म्हणतात, नाही! म्हणजे काही काळानंतर आपोआपच विस्मरण होते. जर त्याचे पून्हापून्हा वाचन किंवा अध्ययन केले तर ते स्मरणात राहील. हे बिस्मरण अनुपयोगामुळे घडते असे नाही तर गेल्या आयुष्यातील बऱ्याच घटना व्यक्तीला आठवतात. न आठवल्यास इतर दुसरे कारणे असतात.
ii) स्मरणार्थ चिन्हे :
आपण ज्या गोष्टीचे वाचन करतो त्याचे ठसे मेंदूवर उमटत असतात व ह्या रेखीव ठशालाच स्मरणार्थ चिन्हे म्हणतात. हे स्मरणार्थ चिन्हे जेव्हा क्षीण पावतात तेव्हा विस्मरण होते.
iii) प्रेरणात्मक विस्मृती :
आपल्या जिवनामधघ्ये अशा काही गोष्टी असतात की त्या आपण आठवण्याचा प्रयत्न करीत नाही कारण त्यामध्ये आपल्याला अपयश व असमाधान प्राप्त झालेले असते. त्या गोष्टी आठवल्या की आपल्याला दुःख होते. आपण अस्वस्थ होतो व ही दुःख व अस्वस्थता टाळण्यासाठी तिचे दमन करत असते व ते प्रसंग आपल्या अबोध मनात जमा होतात, म्हणून त्याचे विस्मरण होते.
२) व्यत्यय सिद्धांत (Interference Theory):
एखाद्या पाठाचे आपण वाचन करीत असतांना त्याचबरोबर इतरही माहिती निर्माण करते त्याला व्यत्यय सिद्धांत म्हणतात.
स्मरणामध्ये ज्या माहितीचे साठवणूक होते, परंतु दुसऱ्या माहितीमुळे बाधा येते ही दोन प्रकारचा असते.
१. पूर्वलक्षी व्यत्यय - Retroactive Interference
२. उत्तरलक्षी व्यत्यय - Proactive Interference
नंतर अध्ययन करण्यात आलेली गोष्ट आधीच्या अध्ययनात त्या गोष्टीच्या प्रत्यावाहनात बाधा निर्माण करतो तेव्हा त्याला पूर्वलक्षी व्यत्यय म्हणतात.
तर काही वेळ अगोदर अध्ययनात आलेली गोष्ट दुसऱ्या अध्ययन गोष्टीमध्ये अडथळा निर्माण करते तेव्हा त्याला उत्तरलक्षी व्यत्यय म्हणतात. यामध्ये व्यत्ययाची दिशा मागेपुढे असते.
३. सुचकाधिष्ठित विस्मरण :-
सुचकच पाहिजे त्यावेळी तयार नसेल तर त्यामुळे घडून येणाऱ्या विस्मरणात सुचकाधिष्ठित विस्मरण (Cue Dependent Forgetting) असे म्हणतात. उदा.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एखाद्या शाळेतील मुलांचा बुद्धिगुणांक काढण्याच्या दृष्टीकोनातुन ५० विद्यार्थी दिलेत व बर्गखोलीमध्ये त्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रज्ञ डॉ.बीने यांची बुद्धिमापन चाचणी दिली. तर चाचणी सोडविण्यासी संबंधित जेव्हा विद्यार्थी शिकवतात. तेव्हा ती खोलीतील जागा व इतर गोष्टीसंबंधी सुद्धा नोंद घेत असतात.
स्मरणामध्ये सुधारणा करता येईल का ? (Improvement in Memory)
कोणत्याही व्यक्तीला वाटते की, आपली स्मरणशक्ती चंचल पाहिजे. त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीचे स्मरण व्हावयास पाहिजे. विद्यार्थी घरी अभ्यास करतात. तेव्हा अध्ययनाच्या महत्त्वाच्या पद्धतीचा ते उपयोग करतात. परिक्षेमध्ये आपल्याला आठवायला पाहिजे व जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण व्हावयास पाहिजे.
स्मृती ही चांगली राहावी म्हणून अध्ययन अधिक श्रमपूर्वक घडून आणून प्रत्याबाहनामध्ये राक्रियता येण्यासाठी काही पथ्ये फायद्याचे ठरतील. हे पाहणे आवश्यक आहे.
स्मरणामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने खालील टप्पे पाळणे आवश्यकच आहेत, ते पुढीलप्रमाणे :
१. वाचनामध्ये आवड व अभिरुची असणे.
एखादा विद्यार्थी जेव्हा वाचन करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आवड व अभिरुची असणे आवश्यकच आहे. नाहीतर विद्यार्थी नुसता पुस्तकाकडे पाहत आहे व त्यातील काहीच भाग समजलेला नाही तर स्मरण हे चांगले होणार नाही.
२. वाचलेला बंध समजून घेणे.
जो प्रसंग आपण वाचलेला आहे. ते स्मरणामध्ये चिरकाल टिकून राहावा असे वाटत असेल तर तो बंध नीटपणे समजून घ्यायला हवा. त्या प्रसंगामध्ये काय रेखाटलेले आहे, तो कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, त्याचे स्वरुप कशाप्रकारचे आहे, ही सर्व माहिती घेतल्यास स्मरण चांगले होते.
३. अत्यध्ययन करणे .
एखादा पाठ आपण वाचावयास घेतल्यास त्याचे पुन्हापुन्हा वाचन केल्यास त्याचे स्मरण चांगले होईल. म्हणेच प्रपाठ पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.
४. प्रतिमाचिन्हाचा उपयोग
आपण जो अध्ययन पाठ वाचतो त्याचे जर आपल्या मनचक्षुसमार उभे केले तर त्याचाही स्मरणात फायदा होतो व जो पाठ आपण वाचला तो दिर्घकाळपर्यंत लक्षात राहू शकतो .
५. काही टप्पे किंया पध्ये पाळली तर स्मरण चांगले होते.
वाचनाचे काही भाग आहेत. प्रत्येक भागांचा वेगवेगळा अभ्यास केला तर तो आपल्या मनामध्ये पक्षा राहतो. व त्याचे संस्कार पळे होतात न अध्ययन करतांना काही पथ्ये पाळणे म्हणजे जोपर्यंत आपल्या पूर्ण भागाचे अध्ययन होत नाही. तोपर्यंत मध्ये न थांबणे. नाहीतर अध्ययन दृढ होणार नाही.
६. जोरजोरात अध्ययन करणे.
मनातल्या मनात अध्ययन करण्यापेक्षा जोरात आवाजात व गाण्याच्या तालासुरात जर वाचन केले तर तो भाग आपल्या स्मरणामध्ये पक्का राहतो.
७. योग्य आराखडा तयार करणे.
पाठाचे वाचन करतांना त्याची योजना करावी व त्याप्रकारे प्रत्येक भागाचे योग्य स्मरण झाल्याशिवाय पुढचा भाग अभ्यासला जाऊ नये. अशा आराखड्यानुसार जर आपण अध्ययन केले तर त्याचे स्मरण हे चांगले होते
८. लक्ष नीट पुरविणे.
ज्या पाठाचे आपल्याला वाचन करावयाचे असेल त्याकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे. त्या अध्ययन पाठाचा आशय काय आहे, त्यामध्ये नेमके कोणते टप्पे दिलेले आहेत, अवस्था कोणत्या आहेत, किती प्रकार आहेत, त्याचे स्वरुप कशाप्रकारचे आहे, कोणते वैशिष्ट्य आहेत याकडे जर अवधान दिले व योग्यप्रकारे वृत्तांत समजून घेतला तर अध्ययनविषय चांगला मनामध्ये राहातो, त्याचे योग्य व निट असे स्मरण होते.
९. संदर्भ लक्षात ठेवणे.
अध्ययनविषयामध्ये नेमके काय दिलेले आहे, त्याचा संदर्भ कशाप्रकारचा आहे, ह्याची जर माहिती घेतली तर त्याचे अध्ययन चांगले होते.
संदर्भ : अभिनव मानसशास्त्र
0 Comments